युपीएससी ही परीक्षा नसून परीक्षा घेणारं एक मंडळ आहे. ज्यांच्यामार्फत नागरी सेवेच्या परीक्षा घेतल्या जातात.
पूर्वपरीक्षा , मुख्यपरीक्षा अणि मुलाखत अशा तीन टप्प्यांमध्ये ही परीक्षा घेतली जात असून त्यामध्ये अनुक्रमे उत्तीर्ण होणं भाग असतं.
पूर्वपरीक्षा ही ४०० गुणांची असून , त्यात दोन पेपर्स असतात. पहिल्या जनरल स्टडीजच्या पेपरमध्ये सामान्य ज्ञान तपासलं जातं. पर्यावरण , इंडोलॉजी , चालू घडामोडी यांसारख्या नवीन विषयांचा यात समावेश केलेला आहे. दुसऱ्या पेपरमध्ये लॉजिकल थिंकिंग , संभाषण कौशल्य , कॉम्प्रिहेन्शन सारखे विषय असून त्यात ८० प्रश्न असतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात १/३ निगेटिव्ह मार्किंग पद्धत्ती लागू केलेली आहे.
मुख्य परीक्षा २००० गुणांची असते. त्यात नऊ पेपर असून एक भारतीय भाषा , इंग्रजी आणि निबंध असे तीन पेपर बंधनकारक आहेत. त्यापैकी भाषांचे गुण एकूण गुणांच्या संख्येत धरले जात नसले तरीही त्यांत उत्तीर्ण होणे आवश्यक असते. अन्यथा इतर पेपर तपासले जात नाहीत.
निबंधाच्या पेपरला २०० गुण आहेत. सामान्य ज्ञानाचे दोन पेपर असून ते प्रत्येकी ३०० गुणांचे असतात. तसंच , २७ विषयांच्या यादीतून तुम्हाला दोन विषय निवडायचे असतात. त्यांचे प्रत्येकी २ पेपर ३०० गुणांचे असतात. म्हणजे भाषा वगळता एकूण परीक्षा २००० गुणांची होते.
मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर उरते ती मुलाखत ! ३०० गुणांच्या मुलाखतीत तुमच्या व्यक्तिमत्वाची चाचणी घेतली जाते. निकाल लावताना मुख्य परीक्षेचे २००० आणि मुलाखतीचे ३०० अशा २३०० गुणांमधून क्रमांक काढला जातो. तुमच्या मेरीट वरील क्रमांकानुसार तुम्ही नियुक्ती केली जाते.
आयएएस , आयपीएस , आयएफएस रेल्वे आणि ट्राफिक अशा अनेक सेवांमध्ये जाण्याची संधी मिळते.
नागरी सेवांमध्ये काम करताना समाज सेवा करण्याची उत्तम संधी मिळते तसेच लोकांशी थेट संपर्क साधता येतो.
या परीक्षेत यश मिळवायचं असेल तर त्याची तयारी मात्र जिद्द आणि चिकाटीने करावी लागते. कोचिंग घेऊन तसेच स्वतः अभ्यास करून याची तयारी करता येते.
या परीक्षेला वयोमर्यादा असून ओपन कॅटगरीत २१ ते ३० वर्षांपर्यंत ४ वेळा , ओबीसी कॅटगरीत २१ ते ३३ वर्षांपर्यंत ७ वेळा तर एससीएसटी कॅटगरीत ३५ वर्षांपर्यंत ११ वेळा ही परीक्षा देता येते.
मराठी माध्यमातून शिकलेले विद्यार्थी ही परीक्षा आणि मुलाखत मराठीत देऊ शकतात.
व्यक्तिमत्व पडताळा
महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांमध्ये युपीएससीबद्दल जागृती निर्माण व्हायला हवी. तीन भागांमध्ये घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेची तयारी योग्य पद्धतीने केल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल. अभ्यासाचं नियोजन , संधी आणि अभ्यासक्रमाची योग्य आखणी या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणं महत्त्वाचं आहे. आपल्या व्यक्तिमत्वाची पडताळणी करून , नक्की काय करायचंय हे ठरवून मगच या परीक्षेला बसा.
पूर्वपरीक्षा , मुख्यपरीक्षा अणि मुलाखत अशा तीन टप्प्यांमध्ये ही परीक्षा घेतली जात असून त्यामध्ये अनुक्रमे उत्तीर्ण होणं भाग असतं.
पूर्वपरीक्षा ही ४०० गुणांची असून , त्यात दोन पेपर्स असतात. पहिल्या जनरल स्टडीजच्या पेपरमध्ये सामान्य ज्ञान तपासलं जातं. पर्यावरण , इंडोलॉजी , चालू घडामोडी यांसारख्या नवीन विषयांचा यात समावेश केलेला आहे. दुसऱ्या पेपरमध्ये लॉजिकल थिंकिंग , संभाषण कौशल्य , कॉम्प्रिहेन्शन सारखे विषय असून त्यात ८० प्रश्न असतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात १/३ निगेटिव्ह मार्किंग पद्धत्ती लागू केलेली आहे.
मुख्य परीक्षा २००० गुणांची असते. त्यात नऊ पेपर असून एक भारतीय भाषा , इंग्रजी आणि निबंध असे तीन पेपर बंधनकारक आहेत. त्यापैकी भाषांचे गुण एकूण गुणांच्या संख्येत धरले जात नसले तरीही त्यांत उत्तीर्ण होणे आवश्यक असते. अन्यथा इतर पेपर तपासले जात नाहीत.
निबंधाच्या पेपरला २०० गुण आहेत. सामान्य ज्ञानाचे दोन पेपर असून ते प्रत्येकी ३०० गुणांचे असतात. तसंच , २७ विषयांच्या यादीतून तुम्हाला दोन विषय निवडायचे असतात. त्यांचे प्रत्येकी २ पेपर ३०० गुणांचे असतात. म्हणजे भाषा वगळता एकूण परीक्षा २००० गुणांची होते.
मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर उरते ती मुलाखत ! ३०० गुणांच्या मुलाखतीत तुमच्या व्यक्तिमत्वाची चाचणी घेतली जाते. निकाल लावताना मुख्य परीक्षेचे २००० आणि मुलाखतीचे ३०० अशा २३०० गुणांमधून क्रमांक काढला जातो. तुमच्या मेरीट वरील क्रमांकानुसार तुम्ही नियुक्ती केली जाते.
आयएएस , आयपीएस , आयएफएस रेल्वे आणि ट्राफिक अशा अनेक सेवांमध्ये जाण्याची संधी मिळते.
नागरी सेवांमध्ये काम करताना समाज सेवा करण्याची उत्तम संधी मिळते तसेच लोकांशी थेट संपर्क साधता येतो.
या परीक्षेत यश मिळवायचं असेल तर त्याची तयारी मात्र जिद्द आणि चिकाटीने करावी लागते. कोचिंग घेऊन तसेच स्वतः अभ्यास करून याची तयारी करता येते.
या परीक्षेला वयोमर्यादा असून ओपन कॅटगरीत २१ ते ३० वर्षांपर्यंत ४ वेळा , ओबीसी कॅटगरीत २१ ते ३३ वर्षांपर्यंत ७ वेळा तर एससीएसटी कॅटगरीत ३५ वर्षांपर्यंत ११ वेळा ही परीक्षा देता येते.
मराठी माध्यमातून शिकलेले विद्यार्थी ही परीक्षा आणि मुलाखत मराठीत देऊ शकतात.
व्यक्तिमत्व पडताळा
महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांमध्ये युपीएससीबद्दल जागृती निर्माण व्हायला हवी. तीन भागांमध्ये घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेची तयारी योग्य पद्धतीने केल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल. अभ्यासाचं नियोजन , संधी आणि अभ्यासक्रमाची योग्य आखणी या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणं महत्त्वाचं आहे. आपल्या व्यक्तिमत्वाची पडताळणी करून , नक्की काय करायचंय हे ठरवून मगच या परीक्षेला बसा.
ह्या बधल काहीही मदत असल्या काह्लील क्रमांक वर संपर्क करावेत.
यशवंत पाटील(सर)-८००७३७७६७४
यशवंत पाटील(सर)-८००७३७७६७४
No comments:
Post a Comment